बुधवार, २६ मे, २०२१

तेलघाणा

 #तेलघाणा

#Oil_Extractors_Stone



बापरे....एवढ मोठं उखळ...

जरी हे उखळ वाटत असलं तरी ते हे उखळ नाही...

हा एक तेलघाणा आहे,असे लाकडाचा  घाणा देखील पाहायला मिळतो..

अगदी जुना साधारणत: 500-600 वर्षा पूर्वीचे असा हा तेल घाणा अधुनिक यंत्रा मूळे निरुपयोगी झालाय...असे कितीतरी जुन्या वस्तू आज रस्त्याच्या कडेला, जुन्या मंदिरं परिसरांत, आपल्याला  पाहायला मिळतात..यासारख्या अनेक वस्तु जुने जातं, उखळ, रांजण हे बेवारस स्थितीत पाहायला मिळतात..या वस्तुनी अनेक वर्षे पूर्वजांनी उपयोगात् आणल्या ...त्यांनी त्यांचं वैभव वाढावल, जोपसल..पण अधुनिक यंत्रानी यांची जागा घेतली आणि यांना उपयोगातुन् हद्द्पार् झाल्या..

असो पण एवढं मोठं उखळ कसं बनवलं असेल, कोणी बनवलं असेल,  कश्या साठी बनवलं असेल बर ...

उत्तर सोपं असलं तरी बनवणारी व्यक्ती किती कुशल असेल.. अशी वस्तू चा वापर बैलाच्या मदतीने शेंगदाणा, तील, सूर्यफुल, नारळ, करडइ इ. पदार्थ पासून तेल काढण्या साठी करत..म्हणुन आपण याला तेलघाणा ही म्हणतो ..अश्या अडगळीत, बेवारस पडलेल्या वास्तू स्वच्छ करुन जतन करूया..नाहीतर तर या ऐतिहासीक लहान वाटणाऱ्या वास्तू मातीमोल होऊन नामशेष होतील.


लेखन:दिनकर लवटे

मो.9561051308


नमस्कार मित्रहो नवनवीन माहीती /भटकंती विषयीची माहिती आता आपण माझ्या ब्लॉगवर पाहू शकता या करता visit द्या

पुढील लिंक वर..


https://youtu.be/gmDxvDyKQFM



शुक्रवार, २१ मे, २०२१

अवकाळी

 



अवकाळी म्हणजे काय? 

वळवाचा पाऊस म्हणजे काय?


अवेळी काळवेळ नसताना अचानक आलेला पाऊस.

तुमच्या-आमच्या राशी चक्रात न बसणारा पाऊस....म्हणजे अवकाळी

उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्च एप्रिल मे महिन्याच्या मध्यंतरी भारतात हमखास अवकाळी पाऊस येऊन जातो.काहीच नाही झालं तरी शिमगा आणि पाडव्याला थोड्याफार प्रमाणात अवकाळी पाऊस येऊन जातो.

पण असा पाऊस मनाला आल्हाददायक आनंद देऊन जात असला तरी हा पाऊस शेतकरी बांधवांसाठी नक्कीच नक्कीच नुकसानदायी ठरतो हे निसर्गाचं चक्र असल्याने याला थांबवता येत नाही.


मानवाने आपल्या दैनंदिन कामकाजासाठी स्वतःला आणि निसर्गाला कालचक्रात बांधून ठेवला आहे.पण निसर्गाचा तसं नाही निसर्गाला मानवाने अगदी काळ,वेळ ऋतु ,महिना,वर्ष,आठवडा,दिवस यामध्ये जखडून ठेवले आहे.पृथ्वीवर होणाऱ्या हवामानाच्या बदलानुसार मानवाने उन्हाळा,पावसाळा, हिवाळा असे हवामानाचा कालचक्र बनवलंय.समुद्रावरील वारा ज्या दिशेने वाहिल त्या दिशेला तो बरसत राहणार, जिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल किती पाऊस कोसळणार.भारतातील पावसाळ्याचा काळ म्हणजे साधारणत जून ते सप्टेंबर या काळाच्या अगोदर पाऊस पडला तर आपण त्याला अवकाळी म्हणतो म्हणजेच अवेळी पडणारा पाऊस काळ वेळ नसलेला पाऊस म्हणजे अवकाळी.हा पाऊस लहान मुले पशुपक्षी यांना सुखाचा क्षण घेऊन जातो.अवकाळी पाऊस म्हणजे मुलांसाठी आनंदाची छान पावसामध्ये गारा गोळा करण्यासाठी मुलं कशाचीही पर्वा करत नाहीत मनसोक्त आनंद घेतात. थंडगार वारा ,गारा यांचा स्पर्श सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो.यात सोसाट्याचा वारा अचानक तापमानात झालेला बदल ढगांची एकमेकांवर आदळून होणारा प्रचंड आवाज, विजांचा कडकडाट आपल्याला अनुभवायला येतो.असा अवकाळी पाऊस काही जणांना आनंद तर काही जणांच्या पदरात दुःख टाकून जातो.




अगदी यात मोठाली झाडे उन्मळून पडतात,पशुपक्षी यांचे निवारे जमीनदोस्त होतात,आंबा ,काजू, द्राक्षे, डाळिंब आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान करून जातो.


पण हा पाऊस जास्त दिवस राहिला तर मान्सून लांबणीवर जातो असा अंदाज बांधायला हरकत नाही.


लेखन: दिनकर लवटे

मो.9561051308


नमस्कार मित्रहो नवनवीन माहीती /भटकंती विषयीची माहिती आता आपण माझ्या ब्लॉगवर/Youtube पाहू शकता या करता visit द्या

पुढील लिंक वर..


https://youtube.com/channel/UCQ-1rJM463UnkUvvRzn07jg


https://dinkarlavate.blogspot.com

सोमवार, १७ मे, २०२१

होयसळ_साम्राज्य आणि राजचिन्ह

 #होयसळ_साम्राज्य

#राजचिन्ह_राजप्रतिक

#Hoyasal_Dynasty

#Logo_Symbol

#Emblem



 होयसळ साम्राज्य कर्नाटकातील एक अतिशय शूर,  प्रतिभावंत,  वैभवशाली  आणि वास्तुकलेचा उत्तम उपासक,कला जोपासणारे कर्नाटक, आंध्रप्रदेशचा काही भाग आणि  तमिळनाडूचा काही भाग यावर राज्य करणारे सामर्थ्यवान राजवंश इसवी सन 950 ते 1355 या काळात होऊन गेला. होयसळ हे  मूळचे पश्चिम घाटातील मलेनाडू चे दहाव्या शतकात होयसळ राजवंश  हळूहळू डोके वर काढू लागला,  होयसळ  विषणुवरधन हे  मुळात जैन धर्माचे अनुयायी होते पण हिंदू तत्वज्ञानी रामानुजाचार्य यांच्या प्रभावाखाली येऊन हिंदू वैष्णव संप्रदायात प्रवेश करून विष्णुवर्धन असे नाव नामकरण केलं, होयसळ वंशातील महत्वकांशी अश्या या राजाने त्याला युद्धात यांचा पराभव करून दक्षिण कर्नाटक (गंगवाडी) आणि नोळंबवाडी चा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला. विष्णुवर्धन यांच्या प्रचंड पराक्रमामुळे होयसळ सम्रज्याची भरभराट झाली यानंतर वीर बल्लाळ 2 आणि वीर बल्लाळ 3 याने साम्राज्य वाढवले. बाराव्या शतकात वेस्टर्न चालुक्य आणि कल्याणी चे कल्चुरी यांच्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊन कावेरी नदीच्या भूभागावर आपलं वर्चस्व निर्माण करून स्वतंत्र राज्यकारभार करू लागले,  बाराव्या शतकात इ.स.1187 मध्ये  वीर बल्लाळ 2 यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करून आपली राजधानी (कर्नाटकातील सध्या हसन जिल्हा ) प्रथम हालेबिडू  म्हणजे द्वारसमुद्र  येथे निर्माण केली, 13व्या  शतकात मुस्लिम आक्रमकांनी राजधानी बेचिराख करून भरमसाठ लूटमार केली असली अस्सल वैभव लुटू शकले नाहीत,  नंतर त्यांनी  ती बेलुर येथे हालवण्यात  आली.


कन्नड लोक कथेनुसार होयसळ यांचे प्रतीक असलेले चिन्ह म्हणजे वाघाची शिकार करणारा युवक साला नावाच्या युवकाने वाघाची शिकार केली व आपल्या जैन धर्मगुरुला ही गोष्ट सांगितली यावरून वाघाची शिकार करणारा युवक असं प्रतीक बनलं तर सांगितलं जातं जुन्या कन्नड भाषेनुसार होइ म्हणजे वध करणे, शीकार करणे, मारणे आणि मारणार युवक म्हणजे साला यावरून या साम्रज्याचे  नाव पडलं होयसाला.

अशा आशयाचा शिलालेख मध्ये विष्णुवर्धन यांनी इ.स.1157 मध्ये कोरला आहे.पण असं असलं तरी विष्णुवर्धन याने वाघाचा प्रतीक असलेल्या चोला राजवन्श यांचा पराभव करून होयसळ साम्राज्य उभं केलं यामुळे या लोककथेला आधार मानला जात नाही यामुळेच होय संघर्षाचं प्रतीक हे वाघाला मारणारा युवक असावा असं मानलं जात.



दक्षिण भारतात कला व वास्तुकला धर्म वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले, होयसळ वास्तुकलेचा उत्तम नमुना आपण बेलुर, हळेबीड, हसन, सोमनाथपूर या भागात पाहायला मिळतो त्या भागात सुंदर डोळे दिपवणारी शेकडो मंदिर आपल्याला पहायला मिळतील. असं असलं तरीही त्यांनी हिंदू धर्मावर जैन आणि बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.


अश्या या वैभवशाली साम्रज्याचा अंत इ.स.1355 मध्ये झाला असला तरीही त्याचे वैभाव आजही अनुभवायला मिळते.


लेखन: दिनकर लवटे

मो: 9561051308


https://dinkarlavate.blogspot.com


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे

गंग_वंश_वैशिष्ट्यंपुर्ण_शिलालेख

 #गंग_वंश_वैशिष्ट्यंपुर्ण_शिलालेख

#Ganga_Dynasty 

#Featured_inscriptions



गंग वंशातील राजांनी भारतावर साधारणतः इ.स.350  ते इ.स. 1434 पर्यंत राज्य केलं, यामध्ये दक्षिण भारतातील शाखेने साधारण इ.स.350 पासून इ.स.1004 पर्यंत तलक्कड,कोलार, बंगलोर, म्हैसूर या प्रदेशावर राज्य केलं तर  पूर्व भारतातील गंग वंशीय शाखेने  बंगाल,आंध्र प्रदेश छत्तीसगड,या प्रदेशावर ती साधारणत इ.स.1038 पासुन इ.स.1434 पर्यंत राज्य केलं.दक्शिन् भारतातील गंग वंशीय यांचें प्रतीके असलेलीं  चिन्हं या  शिलालेखावर दिसून येतात यात मुख्यता रॉयल छत्री,शंख, चक्र,चंद्र आणि सूर्य अशी पाच चिन्हं दिसून येतात.(हत्ती,गोल्डन नाणे ही काही ठीकाणी पहायला मिळते)  छत्री हे ही प्रतिक असल्यामुळें आपल्याला भोग नदिश्वर् मंदिरात अखंड दगडात कोरीव केलेली Royal Umbrella  पहायला मिळते. असा हा एक वैशिष्ट्यंपुर्ण शिलालेख श्रीरंगपट्टणमला असुन साधारणता शिलालेखात दोन किंवा तीन चिन्हं आढळून येतात.

लेखन:दिनकर लवटे

मो: 9561051308


https://dinkarlavate.blogspot.com


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे

लॉकडाउन आणि समस्या

 #लॉकडाउन

#ताणतणाव  

#लठ्ठपणा

#चिडचिडेपणा


ताणतणाव, लठ्ठपणा, चिडचिडेपणा हा घरा -घरात नवीन समस्या बनत चाललं आहे.  मित्रहो लॉकडाउन मुळे समस्त मानव जातीवर विशिष्ट परिणाम दिसून येत आहे गेल्या दीड वर्षात विविध काळात लागलेल्या लॉकडाउन मूळे सर्वजण हैराण झालेत.अशा काळात गरज आहे एकमेकांना समजून घेण्याची आणि एकमेकांना धीर देण्याची.यामुळे नोकरदार ,व्यवसायिक, शेतकरी, व्यापारी, तरुण, महिला, मुलं, वृद्ध या सर्वांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागते.

नोकरी गमावण्याच्या भीतीने घरातील तरुण तरुणी तणावाखाली वावरत आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्रातील कामगार घरात असल्याने तरुण वर्ग तणावात आहे, कोरोना च्या भीती ने घरी बसाव तर नोकरी जाण्याची भीती,  बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्याची भीती,गाडीचे हप्ते, घरभाडे, वीजबिल, हॉस्पिटलचा खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च,घरखर्च याच्या ओझ्याखाली जीवन जगत आहे.

घरात सतत  टीव्ही पाहुन त्यातील नकारात्मक बातम्या, त्यात भर घालत आहेत, ताण तणाव वाढवण्यास टीव्ही चॅनेल्स आणि  मीडिया कारणीभूत ठरत आहेत.

कामावर,ऑफिसला जाण्यासाठी लागणारी बस, कामावरची जागा, ऑफिस, कॅन्टीन या संक्रमण करणाऱ्या सर्वात मोठे स्त्रोत आहेत त्यामुळे नोकर,कामंगार मध्ये भीतीचे सावट हे जास्तच आहे.यासाठी सर्वांनी घरातील वातावरण आनंदी हसतमुख ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.


लहान मुले, वृद्ध, गृहिणी यांच्यावरही मोठ्या प्रमाणात मानसिक तणाव दिसून येत आहे त्यांना घरातून बाहेर पडता येत नसल्याने एकलकोंडी बनत चालले आहेत  वृद्ध, यांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांना गुडघे दुखी, हाय-बीपी, लो-बीपी यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लॉकडाउन मुळे लठ्ठपणाची समस्या, वजन वाढण्याची समस्या दिसून येतात.तरुण वृद्ध सगळेच मोबाइलच्या दुनियेत व्यस्त आहेत. त्यामुळे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याचा येणाऱ्या पिढीवर फार मोठा दूरगामी परिणाम होऊ शकतो.

मुलांचे शिक्षण मित्र,शाळा, कॉलेज, वर्ग, शिक्षक त्यांना न पाहताच पुढच्या वर्गात जाऊ लागले आहेत त्यामुळे येणारी पिढी ऑनलाईन क्लासला जास्त प्राधान्य देईल, एवढं असूनही शाळेची काही कमी होताना दिसत नाही परिणामी शिक्षण पूर्ण होईल. पण समाजात वावरण्यासाठी चे शिक्षण हे चार भिंतीच्या बाहेर  पडूनच घ्यावं लागतं. 

घरात बसून लाखो कमवू पण पोटासाठी लागणारे अन्न ते शेतात जाऊन च पिकवाव  लागतं. सगळे जग लॉकडाउन च्या छायेत्  बंद झालं तरी जगाला जगवनारा हा पोशिंदयाला शेतात जाऊन काम करावाच लागतच. तुमच्या संकट समयी तो राबतोय उन्हात, पावसात, थंडीत,अन लॉकडाउन मध्ये ही...त्याच्या संकट काळात तुम्ही त्यामागे उभे राहाल हीच अपेक्षा...

.

.

हा संकटसमयी चा काळ नक्कीच निघून जाईल यासाठी आपण आपल्या घरातील  वातावरण हसत-खेळत, आनंदित ठेवू, होणाऱ्या ताण-तणाव, दुष्परिणामांपासून दूर राहू.


👉🏻नियम्  पाळूया,कोरोनाला हरवूया...


लेखन: दिनकर लवटे

मो: 9561051308


https://dinkarlavate.blogspot.com


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे

रविवार, १६ मे, २०२१

करोना_आणि_वास्तव

#करोना_आणि_वास्तव 

खरच करोना आहे का? 

तर याच उत्तर होय अस म्हणावं लागेल ..

.

.

हा करोना अगदी चीन पासून आज भारतातील अगदी गल्लीबोळात,वाड्या वस्तीवर च नाही तर डोंगर दऱ्यात राहणाऱ्या पर्यंत पोहचला, याचा प्रवास सर्वांची झोप उडवतो आहे.

स्टेज 1,2,3,4 आणि आता wave 1, Wave 2 पुढे wave 3 वगैरे .....

यात नाहक बळी जातोय ते म्हणजे गरीब आणि मध्यम वर्गीय समाजाचा .....दीड वर्षाच्या काळात ना सरकार कडून ना आरोग्य यंत्रनेकडून असा काहीही ठोस माहिती देन्यात आली नाही ..शहरी भागातला करोना ग्रामीण भागात हा हा म्हणता पोहचला .आधीच ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असल्याने मर्यादित असलेल्या शहरी भागातील सुविधांवर मोठ्या प्रमाणांत ताण पडू लागला ...यातच वाढती रुग्ण संख्या अनं हॉस्पिटल चे बाजारीकरणं यात सामान्य जनता मेटाकुटीला आली आली आहे .. हे बाजारीकरण त्वरित थांबवलं पाहीजे पण सरकार याकडे लक्ष देईल असं वाटतं नाही. काही दिवस हाच रुग्ण वाढीचा दर राहिला तर आरोग्यसेवा विस्कळीत होऊन जाईल ...उपाययोजना वेळेत झाल्या नाही तर रुग्ण वाढीचा उद्रेक होईल.सुरवातीच्या काळांत करोना लक्षण असतील तर कोणते औषधोपचार करावेत टेस्ट कधी, किती दिवसांनी करावी याबद्दल पूर्ण अस्पष्टता यामुळे सर्वांच्याच मनात संभ्रम कायमचं घर करून बसला आहे.चाचणी करण्यापासून ते उपचार करुन आणि परत घरी जाण्यापर्यन्त प्रत्येक जण दलाली करतोय. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर रिपोर्ट्स् आलें कि लगेच लॅबोरेटरी कडून फोन यायला लागतात औषध हवी असतील तर या फोनवर संपर्क करा ..मग इथून पुढे शोधमोहीम चालूं, औषध, दवाखाना,ऍम्ब्युलन्स, कॉरनटाइन साठीबेड, ऍडमिट साठी बेड, वेन्तिलेटर,ऍडमिट होण्याकरता अगाऊ पैसे यात प्रत्येक वेळी रुग्णास जादा चे पैसे मोजल्या शिवाय कोणतीही वस्तू अथवा साधन उपलब्ध होत नाही.यात सामान्य माणुस कंगाल झालाय. उद्योग धंदे बंद झाले, परिणामी पैसे कमवायचे मार्ग बंद झाले असले तरी, काम बंद घरभाडे चालू,कर्जाच हफ़्ते चालू, दुकान बंद दुकानभाडे चालू, ही एक नैसर्गिक आपत्ती म्हणायला हरकत नाही.यात अनेक परिवार उध्वस्थ् झाले,कित्येक होत आहेत,उपचार अभावी, पैश्या अभावी कितीतरी रुग्ण दगावले.यासाठी भारत सरकारने त्वरित मोफत औषधोपचार चालू करायला हवी. कितीतरी कुटुंब देशोधडीस लागले, कितीतरी अनाथ झाले, लहान मुलंबाळं आई वडिलांपासुन वेगळी होऊ लागली, नातेवाईक असतानाही बेवारस होण्याची वेळ येत आहे, छोट कुटुंब असेल तर विचार करा काय अवस्था होत असेल,वाहनाची गैरसोय यामुळे ना कोणाला भेटता येते ना, कोणी इच्छा असुन कोणाला मदतही करू शकत नाही,ना आपल्याच नात्यातील रुग्णास भेटु शकत नाही, ना त्याची जेवणाची सोय करू शकत नाही,ना कोणाच्या अंत्यविधीला ही जाऊ शकत नाही.जिवंतपणी सगळ्यांची अवहेलना होत आहे ती मेल्यानंतरही संपत नाही .हे तुमचं आमचं दुर्दैव म्हणायच की सरळ-सरळ रचलेल छडयंत्र म्हणाव.



👉 नियमा चे पालन करूया, करोना ला हद्दपार करूया.


लेखन:दिनकर लवटे

मो: 9561051308


https://dinkarlavate.blogspot.com


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे आहे

कृष्णामाई


 ------० कृष्णामाई ०------

अंगणी अवतरली कृष्णामाई......

मा. उमाजीराव सनमडीकर यांच्या अथक परिश्रमातून आणि त्यांच्या सततचा पाठपुरावा यातून ही जन्म घेतलेली ही अमूल्य अशी जीवनदायीनी योजना....म्हैसाळ उपसा सिंचन योजना..साधारणत: 200 ते 250 किमी चा प्रवास करून  आज  आपल्या सर्वांच्या दारात कृष्णामाई उतरली.

एप्रिल 1984 साली या प्रकल्पाला मिरज,तासगाव,कवठेमहन्काळ,जत अशी मंजुरी मिळाली असली तरी जत शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याला मंजुरी मिळाली नव्हती.

 मा. उमाजीराव सनमडीकर  यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा मुळे 1994 -95 मध्ये टप्प्याला मंजुरी मिळाली. जतचा  भुभाग हा डोंगर ,पठारी,असमतल असल्यामुळे या प्रकल्पाला लवकर मंजुरी मिळणे आणि खर्चही खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचे मंजुरी मिळण्यास खूप अडचणी आल्या. असमतल भुभाग असल्यामुळे झालेल्या सर्वेक्षणात वारंवार  बदल करून, नवीन सर्वे करण्यात आला यात बराच वेळ गेला.

मध्यंतरी अनेक सरकारे बदलली कधी निधीअभावी तर कधी राजकीय आकसा पोटी,  प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास सुमारे पंचवीस वर्षे लागली.

तालुक्याच्या विकासासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली जमिन,  तर कित्येक शेतकऱ्यांची घरे या सर्वेक्षणात जमीनदोस्त झाली, यामध्ये अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी दिलेले योगदान विसरून चालनार नाही.सततचा दुष्काळ आणि कमी पर्जन्यमान यामुळे येथे दारिद्र बघायला मिळतं, यामुळे येथील सर्वसामान्य शेतकरी पशुधनावर अवलंबून आहे, संपूर्ण तालुक्यात बारमाही वाहणारी नदी किंवा वर्षभर पुरेल असेल तलाव या भागात नाही यामुळे येथील शेती पूर्ण पावसावर अवलंबून असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.

तरीही दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्‍यांनीही थेंब थेंब पाण्यावर डाळिंब, द्राक्ष, बोर यांच्या बागा फुलवल्या पण,  सन 2001-2002 मध्ये  दुष्काळाने परत बागा उदवस्थ् झाल्या.  पण इथला शेतकरी खचेल तो कसला परत उठला, कंबर कसून नव्या जोमाने आज परत तो बागायती क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे निसर्ग नक्कीच त्याला साथ देईल हीच अपेक्षा.

दारी आलेल्या कृष्णामाईचे पाणी पाहून शेतकरी राजाच्या डोळ्यात पाणी  तरंगल.. मा.उमाजीराव सनमडीकर, मा. विलासराव जगताप, मा.जमदाडे साहेब, मा.सुनील भैय्या पवार, मा. विक्रम दादा सावंत, मा. जयंतराव पाटील यांनी सर्वांनी सतत पाठपुरावा करून जत तालुक्याला नवसंजीवनी दिली याचा पुरेपूर फायदा तालुक्यातील शेतकरी बांधवांना होईल.

कायमचा दुष्काळी असणारा हा तालुका सुजलाम सुफलाम होईल ह्यात वाद नाही तरुणांनी मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात काम करून सर्वांगीण विकास घडवून आणून आणला पाहिजे यातून सधन शेतकरी, सधन बागायतदार पिढी निर्माण होऊन तालुक्याच्या विकासाचा भाग बनतील.

गेल्या अनेक पिढ्या कृष्णा-कोयनेच्या नावे गीत गात असत, त्यांची थोरवी गात असत, त्यांनी गायलेली थोरवी आज कृष्णामाई  ने ऐकली म्हणायचं.. 

कृष्णा कोयना च चांगभलं..

हाल्याळ  नदीचे चांगलं....

 पूर्वजांनी, तुम्ही-आम्ही कृष्णामाई ला हात जोडून केलेल्या नमस्काराच आज फळ आज  मिळालं असं म्हणायला हरकत नाही ...


कृष्णेच्या पाण्याची लई पुण्याई.. 

जिथे जाई तिथे सुखसोयी 

अंगणी अवतरली कृष्णामाई.. 

अंगणी अवतरली कृष्णामाई...


हे कृष्णामाई कित्येक वर्षे पाण्यासाठी धडपडणाऱ्या तूझी वाट पाहणाऱ्या बळीराजाला सूखी कर समृद्ध कर.....


लेखन : दिनकर लवटे

मो: 9561051308

https://dinkarlavate.blogspot.com

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे.

=====०रायकोटी किल्ला ०====

=====०रायकोटी किल्ला ०====== #Rayakottai_Fort #Rayakottai_Hill_Station https://youtu.be/aHvTqCxKOUU तामिळनाडूच्या कृष्णगिरि जिल्ह्यातील एक ह...