शनिवार, १५ एप्रिल, २०२३

=====०रायकोटी किल्ला ०====



=====०रायकोटी किल्ला ०======


#Rayakottai_Fort

#Rayakottai_Hill_Station


https://youtu.be/aHvTqCxKOUU


तामिळनाडूच्या कृष्णगिरि जिल्ह्यातील एक हील स्टेशन..


बेंगलोर पासून साधारण चा 75 किलोमीटर असलेलं हा रायकोटी किला. हा किल्ला पूर्वी विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. राजा कृष्णदेवराय यांनी या किल्ल्याचे निर्माण कार्य 15 व्या शतकात  केलं.या प्रांतातील पाळेकर राजा जगदेव राया यांच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता.या शिवाय त्या भागातील एकूण बारा किल्ले त्यांच्या अधिपत्याखाली असल्याने या भागाला बारा महाल असे म्हटलं जायचं. 

काहीं काळ हा किल्ला शहाजी राजे यांच्या ताब्यात होता. नंतर तो म्हैसूरच्या वोदियर् आणि टिपू सुलतान याच्या अधिपत्याखाली होता टिपू सुलतानाच्या मृत्यू नंतरचं तो इंग्रजांकडे गेला. इंग्रजानी तेथे त्यांचीं लष्करी छावनी उभारली.त्यांच्यां खुणा आजही तेथे पाहायला मिळतात.

किल्ल्याची उंची साधारणतः 1500 मिटर असावी. किल्ला चढण्यासाठी मध्यम चढणीचा आहे. किल्ल्यावर एक शिवमंदिर अणि एक गुहा ही पहायला मिळते. येथे ऋषी मुनींवरस्वामी यांनी तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. 

किल्ल्यावरून सभोवतालचा प्रदेश अतिशय सुंदर अणि मनमोहक दिसतो. किल्ल्यावरची हवा अतिशय आल्हाददायक अणि मनाला चेतना देऊन जातो. 

या किल्ल्या कडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं असल्याने येथे किल्ल्यांवर सोई सुविधा नसल्याने पर्यटक इकडे येण्याचे टाळतात.पण ट्रेकिंग करण्याची आवड असणारे काय पर्यटक या किल्ल्याला जरूर भेट देतात.आपल्याला ट्रेकिंगची आवड असेल तर आपण नक्की या किल्ल्याला भेट देऊ शकता.


Note :या व्यतिरिक्त अधिक माहिती जाणकार मंडळी कडून  मिळेल ही अपेक्षा. 

आपल्याला लेख कसा वाटला नक्की कळवा. 

लेखन: दिनकर लवटे

मोबाईल: 9561051308

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे.

अधिक माहित साठी login करा 

YouTube :https://youtu.be/aHvTqCxKOUU


पूर्वद मर्यादे

शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरून पुढे 300 वर्ष हिंदूचा दबादबा ठेऊन दक्षिण भारताला गुलामापासून मोकळे केले, बाटवलेली, पाडलेली मंदिर पुन्हा उभारू लागली, मंदिरात घंटा वाजू लागल्या, देवधर्म परकीय आक्रमकांच्या जोखडातून मोकळे झाले. धर्मासाठी अधर्मा विरूद्ध लढलेल्या,  वीरपुत्रांना आपन विसरलो, 13 व्या दशकात धर्मासाठी परकीय शक्तिविरुद्ध लढलेल्या दक्षिण भारतातील  हट्टीकर कुरुबा-धनगर  पुत्रांचा इतिहास मात्र  कोणालाही माहीत नाही, केवळ ते मेंढपाळ म्हणुन कोणी समजून घेत नाही अणि मान्यही करत नाही असच म्हणाव लागेल. जगाच्या पाठीवर ज्यांनी एक आदर्श, सुवर्णमय, दैदीप्यमान अस हिंदूराष्ट्र निर्माण केल याचा विसर पडणे हे आपल सर्वांचे दुर्दैव म्हणाव लागेल.
मनी बांधुन स्वप्नं हिंदू राष्ट्राचे
आशिर्वाद घेऊन गुरूचे
स्मरुणी पूर्वजांचे बलिदान
पू

 पूर्वद मर्यादे, पूर्वद मर्यादे 

उभे केले हिंदूराष्ट्र. 

 
विजयनगर.....विजयनगर.... विजयनगर....
जगापेक्षा वेगळी सोन्याची नगरी.... हम्पी... जगातील अफाट अश्या हिंदू साम्राज्याचा राजा म्हणुन सुवर्णसिंहासन वर धनगर पुत्रांची वर्णी लागली तो दिवस म्हणजे 18 एप्रिल 1336.

जगाच्या पाठीवर मेंढ्या राखणारे मेंढपाळ अणि गाई म्हशी पळणार्‍या पशुपालक समुदायातील लोकानी आपल्या पराक्रमावर त्याच्या मातृभूमीवर हजारो वर्षे राज्य केले. त्यांचा इतिहास हा सुवर्ण अक्षरात कोरला गेला यामध्ये ख्रिस्ती धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त,याशिवाय अनेक राजसत्ता मेंढपाळ समुदायातील लोकानी उलथून टाकल्या. याउलट भारतातील ही या समुदायाने भारतीय भूमीवर अनेक वर्षे अधिसत्ता गाजवली यामधे चंद्रगुप्त मौर्य, विजयनगर चे संगम घराणे, यादव घराणे, इंदोरचे होळकर राजघराने , तामिळनाडू जिंजी चे कोनार राजघराणे , तामिळनाडू मधील राजे वीरपंड्या, राजे पांढरे, राजे हाके, राजे थोरात, राजे नेमाजी, हांडे घराणे, दक्षिणेतील पल्लव वंश, याशिवाय अनेक अपरिचित घराण्यानी सत्ता गाजवली पण इतिहासच्या पानावर याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही यांच्यापेक्षा मोठ दुर्दैव या समाजाच नाही. जेवणाच्या पंगतीत वाढणारा अणि इतिहास लेखनाच्या पंगतीत आपला माणूस असल्याशिवाय त्या समाजाची डाळ शिजत नाही. जोपर्यंत हरीण आपल्या धावण्याची शौर्य गाथा स्वतः लिहीत नाही तोपर्यंत ती शिकार्‍याची गौरव गाथा बनून राहील. यापैकीच  एका दक्षिण भारतातील जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या संगम घराण्याबदल ओळख या माध्यमातून करून घेणार आहोत

दक्षिण भारतातील राज्यांची कीर्ती देश-विदेशात पोहोचली होती सोन्याचा धूर इथल्या घराघरातून निघत होता म्हणायला हरकत नाही. यूरोप, आफ्रिका, आशिया खंडातील देशाबाहेर व्यापार वाढायला, 10-11 व्या शतकात दक्षिण भारत एक वैभवसंपन्न राष्ट्र बनले होतं त्यात देवगिरीचे यादव, द्वारसमुद्राचे होयसाळ वारंगळचे  काकतेय राजे, चोळ, पांड्य,  यांची राज्य भरभराटीला आली होती हिंदुधर्माच्या सगळीकडे उदो उदो चालू होता मोठे मंदिर बांधण्याची कामे चालू होती भगवी पताका सगळीकडे डोलाने फिरत होता पण प्रमुख राज्यकर्त्यांची दक्षिण भारतावर प्रतेक राज्यकर्त्याला दक्षिण भारतावर एकछत्री अंमल हवा होता यासाठी आपापसात ते सतत युद्ध करत असत त्यामुळे प्रजा, लष्कर यांचा कंबरड मोडून पडलं होतं
परकीय आक्रमकांच वादळ भारतवर्षावर घोंगावत असतानाही या हिंदू राजवटींनी याला मनावर घेतलं नाही याशिवाय आपापसात भांडण-युद्ध करण्यात वेळ वाया घालवू लागले उत्तर भारतात झालेल्या परकीय आक्रमणापासून दक्षिण भारतातील राजा महाराजांनी एक ही धडा घेतला नाही असेच म्हणावे लागेल आज ना उद्या वादळ आपल्यापर्यंत पोहोचेल याचं अजिबात यांना भय नव्हते.
अखेर परकीय आक्रमणाचे वारे दक्षिण भारताच्या दिशेने वाहू लागले सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगवरती दिसणारे धुळीच्या लोटच्या लोट देवगिरीच्या सीमेवरती येऊन पोहोचला.
1296मध्ये, अलाउद्दीन खल्जी याने भारतातील दख्खन 
प्रदेशातील यादव (गवळी) राज्याची राजधानी देवगिरीवर हल्ला केला.  यात यादव राजानी तह केला प्रतिवर्षी खंडणी देण्याच्या अटीवर युद्धाला पूर्णविराम दिला या छाप्यात अलाउद्दीनला मिळालेली संपत्ती इतकी होती की अलाउद्दीनच्या उत्तराधिकार्‍यांनी उधळपट्टी केल्यानंतरही त्यातील मोठा भाग 1350 च्या दशकात फिरोजशाह तुघलकाच्या कारकिर्दीपर्यंत राहिला. १६व्या शतकातील इतिहासकार फिरिश्ता यांच्या मते, अलाउद्दीनने मिळवलेल्या संपत्तीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होता.
600 मण सोने,
1,000 मण चांदी
7 मण मोती
माणिक, नीलम, हिरे आणि पन्नासह 2 मण मौल्यवान दगड
4,000 रेशीम आणि इतर वस्तू
कदाचित यापेक्षा ही अधिक असू शकते.
१३०० च्या दशकात, जेव्हा रामचंद्रने दिल्लीला वार्षिक खंडणी पाठवणे बंद केले, तेव्हा अलाउद्दीनने त्याला वश करण्यासाठी 1308 मोठे सैन्य पाठवले. यात यादव राजाचा पराभव झाला. देवगिरीच्या या दुसर्‍या मोहिमेमुळे रामचंद्र अलाउद्दीनचा जामीनदार बनला. आणि यादव साम्राज्याचा शेवट झाला.
याप्रमाणे, एकामागोमाग वारांगळ चे काकतेय,होयसाल पांड्य, चोळ अश्या दक्षिण भारतातील सर्व सत्ता संपुष्टात आल्या.


संगम घराने-कुरुबा-धनगर-हटकर
तुंगभद्रे च्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या संगम परिवारातील  कुरुबा  (धनगर-हटकर) समाजातील भावना संगम हे वारंगळच्या  काकतेय राजदरबारात मोठे सरदार/कोषागार होते. यांचा बेलारी, हम्पी, तुंगभद्रा नदीच्या खोर्‍यात दबदबा होता. अतीशय शूर, धाडसी, काटक अशी लोक या भागात वास्तव्यास होती, सोबतीला रामोशी समाजातील अनेक वस्त्या या भागात होत्या.
रामायणातही हंपी आणि आसपासच्या प्रदेशाचा संदर्भ देतो. रामायणातील वाली आणि सुग्रीव यांची राजधानी किष्किंधा ही अनेगोंडीजवळ वसलेली असल्याचे सांगितले जाते. 'सीता सरोवरा', 'रामपद', वाली भंडारा', 'सुग्रीवाची गुहा' आणि 'शबरीचा आश्रम' अशी नावे असलेली ठिकाणे त्या महान महाकाव्याच्या आठवणी आपल्यासमोर आणतात.  आसपास टेकड्या 'ऋष्यमूका', 'मल्या-वंता' आणि 'माटुंगा' या नावाने प्रसिद्ध आहेत; ही नावे रामायणात आढळतात.
त्या काळात राजा प्रतापरुद्र  काकतेय  संस्थांनचा राज्य कारभार पाहत होते. त्यांच्या दरबारी भावना संगम काम करत होते. भावना संगम यांचा विवाह कम्पली राज्याचे राजे रामाराजे याची बहीण..... हिच्याशी झाला ते काकतेय दरबारात कोषागार प्रमुख म्हणुन काम करत होते..
यादरम्यान यांच्या पोटी महाभारतातील पाच पांडवांचा पुनर्जन्म झाला म्हणण्याला हरकत नाही, त्यानीच पुढे दक्षिणेत हिंदू राष्ट्र निर्माण केल . विजयनगर साम्राज्याचा संस्थापक भावना संगम यांच्या पोटी पाच  रत्ननी जन्म घेतला घरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला अणि तेव्हापासुनच स्वातंत्र्य साम्राज्याची स्वप्न उरी बाळगणाऱ्या सामान्य कुरुबा समाजातील सरदाराचे  वारगाल च्या काकतेय राज्याच्या दरबारात वजन वाढू लागले. या लाडक्या हक्कराया, बुक्कारया ,कंपना, मुद्दप्पा, मराप्पा अशी पाच वीरपुत्रांना राजकीय प्रशिक्षण देऊ लागले  आणि हेच ते पाच पांडव ज्यानी भारतवर्षाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल. ज्याप्रमाणे पांडवानी अधर्माचा पराभव करून सत्याचे/धर्माचे राज्य आणले. अगदी त्याप्रमाणे या कुरुबा मेंढपाळ बांधवांनी मुस्लीम आक्रमकांनी गिळंकृत केलेल राज्य परत काबीज करून हिंदू धर्माची सुवर्ण पताका पुढची 300 वर्षे अखंड ठेवली
लहान वयात त्यांना घरची लष्करी परंपरा असल्याने, मल्लविद्या, घोडेस्वारी, तलवारबाजी, याचे अंश रक्तात असल्याने त्यात त्यांना पारंगत, तरबेज होण्यात वेळ लागला नाही, पिढीजात समाजाच्या परंपरेमुळे वडीलधारि मंडळीना नेहमी आदराने, सन्मानाने सामोरे जात. यामुळे साम्राज्य उभे करताना या पाचही बांधवांनी आपल्या वडील बंधूंनी नेमून दिलेले कार्य, वचन अगदी मरेपर्यंत पळाल. त्यामुळे या भावंडांना कधी सत्ता संघर्ष करावा लावला नाही अगदी याच कारणामुळे पूर्ण दक्षिण भारतावर हुकुमत गाजवणे या संगम बंधूना खूप सोईस्कर झाल. पुढे ते काकतेय दरबारात काम करू लागले.
देवगिरी च्या यादवांचे खरे वारसदार हे धनगर च म्हणावे लागतील. संस्कृत मध्ये धेनु म्हणजे गाय,धेनु, ज्याच्याकडे गाईचे धन.... गोधन तो धनगर... याबरोबर त्यांच्याकडे मेंढ्या असत.. सभोवतालच्या नैसर्गिक वातावरण नुसार ते आपला व्यवसाय करत. धेनुगर या शब्दापासूनच धनगर या शब्दाची उत्पत्ती झाली असावी. कदाचित देवगिरी च्या पतनानंतर त्यांनी आपली ओळख लपवली असावी अणि ते दक्षिणेत आले असावेत पण याची स्पष्टोक्ती मिळत नाही अणि नाकारता ही येत नाही....
काकतेय साम्राज्याच्या पाडावानंतर बर्‍याच सरदारांना पकडून त्यांना मुसलमान बनवण्यात आल त्यांना बंदी बनवून दिल्लीला नेण्यात आल. यात हक्करया अणि बुक्करया यांचा ही समावेश होता.. करारी बाणा, लढाऊणा, साहसी नेतृत्व, लष्करी नान, त्याची वर्तन, आचरणाने त्यांनी मुस्लिम सरदारांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना दक्षिण काबीज करून घेण्यासाठी परत पाठवून दिले. याचा फायदा घेऊन त्यांनी साम्राज्य निर्माण करण्याची इच्छा त्याचे वडील भावना संगम याना बोलून दाखवली यावर त्यांनी त्याचे गुरू विद्यारण्य याना भेटण्याचा सल्ला दिला.. गुरूंचा आशिर्वाद घेऊन सभोवतालच्या सर्व समाजातील सरदारांना सोबत घेऊन नव्या हिंदू साम्राज्याचा संकल्प केला.
पण गरम रक्ताचे हे हट्टीकर कुरुबा-धनगर शांत बसतील ते कसले. 13 व्या शतकात तुंगभद्रे तीरावर कुरुबा समाजातील जमिनदारांच्या भेटगाठी वाढल्या.. पै-पाहुण्या बोलावणं धाडले.. सांगावा धाडले..  बैठका झाल्या निर्णय झाला प्रत्येकाच्या घरातील माणूस हक्क बुक्काच्या सोबत राहील. हळव्या मनाच्या या समुदायातील लोकानी हक्क-बुक्काच्या शब्द तळहातावर झेलला आणि आपल रक्त या साम्राज्यासाठी सांडल. मुस्लिम आक्रमणाने कंबरडे मोडलेले सर्व  लहान मोठे राजे, पाळेगार, सरदार यांचे मोठे सहाय्य वीर पुत्रांना मिळाल. दक्षिण भारतातील सर्व समुदायातील लोकाना एकत्र करून 18 एप्रिल 1336 विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. पुढे संपूर्ण दक्षिण भारत आपल्या साम्राज्यास जोडला अन अखंड 300 वर्षे राज्य केला.
पहिला राजवंश संगमा - या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे चार शंभर वर्षे राज्य केले असे समजले जाते.
बुक्क भूपति राया १०८२-१०८७
हरिहर राया- पहिला १०८७-११०४
बुक्क महाराया ११०४-११२६
सदाशिव राया ११२६-११५२
पुरंदर राया ११५२-१२०७
प्रताप देव राया १२०७-१२२७
वीर प्रताप देवराया १२२७-१२४२
प्रताप वेंकट राया १२४२-१२५१
बुक्क भूपति राया- दोन १२५१-१२६०
हरिहर राया- दोन १२६०-१२८०
बुक्कन्ना वोड़यारुराया- पहिला १२८०-१२८५
युवराजा कुमार कंपना राया १२८५-१२९०
देव राया -१ १२९०
गुंडम्मा राया १२९०
बुक्क राया- पहिला १२९०-१२९४
संगमा राया १२९४- यांचा पुत्र भावना संगम, म्हणुन संगम घराने असा उल्लेख केला जातो
हरिहर राया- तीसरा १२९४
युवराजा कुमार कंपना राया १२९४
बुक्क राया- दोन १२९४-१२९५
बुक्कन्ना वोड़यारुराया- पहिला १२९५-१३०४
अभिनवा बुक्क राया १३०४-१३०६
बुक्क राया- दोन १३०६-१३२२
बुक्क राया- तृतीय १३२२-१३३०
नरसिंम्हा राया १३३०-१३३२
देव राया- द्वितीय १३३२-१३३९
मल्लिकार्जुन राया १३३९-१३४८
अच्युत देवराया १३४८-१३६०
कृष्ण राया १३६०-१३८०
यीम्मड़ी हरिहर राया १३८०-१३९०
देव राया- २ १३९०-१४०४
बुक्क राया-४ १४०४-१४०५
वीरूपाक्ष राया-१ १४०५-१४०६
देव राया- ३ १४०६-१४२२
रामचंद्र राय वीर १४२२
वीर विजय बुक्क राय १४२२-१४२४
देव राय २ १४२४-१४४६
त्र्यंबक राया १४४६-१४६०
मल्लिकार्जुन राय १४६०-१४६५
विरुपक्ष राय २ १४६५-१४८५
प्रौढ राय १४८५
सालुव घराणे
नरसिंहदेवरायः इ.स. १४८५-१४९१
तिम्मा भूपाल: १४९१
नरसिंहराय-१: १४९१-१५०५
तुलुव घराणे
नरसानायकः १४९१-१५०३
वीरनरसिंहरायः १५०३-१५०९
कृष्णदेवरायः १५०९-१५२९
अच्युतदेवरायः १५२९-१५४२
सदाशिवरायः १५४२-१५७०
अरविदू घराणे
अलियरामरायः १५४२-१५६५
तुरुमलदेवरायः १५६५-१५७२
श्रीरंग-१: १५७२-१५८६
वेंकट-२: १५८६-१६१४
श्रीरंग-२: १६१४
रामदेव: १६१७-१६३२
वेंकट-३: १६३२-१६४२
श्रीरंग-३: इ.स. १६४२- १६४६

References :1)वारंगलच्या दरबारात हरिहर आणि बुक्का हे कुरुबा जातीचे कोषागार अधिकारी होते. मॅन्सेल लाँगवर्थ डेम्स , पोर्तुगीज भाषेचे विद्वान, दुआर्टे बार्बोसाच्या पुस्तकाच्या भाषांतरात असे साक्ष देतात की संगमा घराणे कुरुबा वंशाचे होते.
2) A forgotten empire of Vijaynagar - Robert swells
3)Bellary District Gazzet
4) Arunachala - Anant Narayan Rao.
5)Beginning of vijaynagar history - H. Heras,S.J
6)Karnatakda veer kshatriyararu - Sham. Ba. Joshi

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

उपळी बुरुज

 https://youtu.be/u0nuGerE5VE

मित्रांनो विजापूर मधील आदीलशाही सल्तनत  ने आपल्या दोनशे वर्षांच्या कारकिर्दीमध्ये विजापुर मध्ये  भरपूर वास्तू बांधल्या त्या वास्तूमध्ये आपल्याला उपळी बुरुज नावाची एक वास्तू पाहायला मिळते, यालाच हैदर खान बुरुज ही म्हटल जात. 

1)  उपळी बुरुज/हैदर खान बुरुज :

हा बुरुज हैदर खान याने इसवीसन 1583 ते 1584 या कालखंडात बांधला. या बुरुजा चा आकार हा गोलाकार अंडाकृती असा पाहायला मिळतो. या बुरुजा वर तसा शिलालेख ही पहायला मिळतो. या बुरुजा वर जाण्यासाठी बुरुजाच्याभोवती गोलाकार पायर्‍या आहेत. विजापूर च्या सुरक्षेसाठी हा बुरुज बांधण्यात आला. बुरुजाच्या वर दोन तोफा ठेवण्यात आल्या असून त्यातील एक तोफ 30 फुट, तर दुसरी 19 फुट लांब आहे. ही वास्तू विजापूर शहरातील सर्वांत उंच अशी वास्तू आहे.


3) लांडा कसाब तोफ :

लांडा कसाब तोफ या ऐतिहासिक अश्या ठेव्या फारशी कुणाला माहिती नाही. विजापूर च्या RTO ऑफिस जवळ असणार्‍या तटबंदीच्या बुरुजावर ही तोफ पाहायला मिळते. येथे एकूण दोन तोफा आहेत यातील एक तोफ 20 फुट लांब तर त्याचा बाहेरचा व्यास 4.5 फुट आहे म्हणजे आपण कल्पना करू शकतो ही तोफ किती मोठी अणि वजनदार आसू शकते. या तोफाचे वजन साधारणतः 40-50  टन आहे. ही बांगडी प्रकारात मोडणारी तोफ आहे. येथील दुसरी ही अपूर्ण अवस्थेत आहे त्यामूळे याची लांबी साधारण 6-7 फूट आहे. 


ही तोफ याच जाग्यावर बनवली असे स्थानिक नागरिक सांगतात. बांगडी प्रकारातील ह्या तोफेची प्रत्येक रिंग जोडून ही 20 फुट लांबीची तोफ बनवण्यात आली. विजापूर मधील असणार्‍या 96 बुरुजा वर अश्या अनेक तोफा पूर्वी ठेवल्या होत्या पण यातील काही तोफा आज पाहायला मिळतात.16 व्या शतकात विजापूर च्या संरक्षण साठी साधारणतः 1000 तोफा असल्याच मानल जाते.

दिनकर लवटे

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

कोळगीरी भैरवनाथ मंदिर- इतिहासांतील पाऊलंखुणा

 ========कोळगीरी====

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेले  कोळगिरी आणि सनमडी रस्त्यावरील प्राचीन भैरवनाथ मंदिर.

सनमडी  व कोळगीरी दरम्यान पसरलेल्या डोंगररांगातील हे एक अतिप्राचीन अकराव्या शतकातील मंदिर आहे.

अति प्राचीन मंदिर स्वच्छ व सुंदर परिसर शांत वातावरण मनाला  चेतना देऊन जाते. मंदिर प्रशासन आणि कोलगिरी ग्रामस्थांनी येथे सुधारणा करून हा मंदिर परिसर सुशोभित केलेला आहे.

असे ऐतिहासिक मंदिराला बदामीचे चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी घराणे,देवगीरी चे यादव यांचा वारसा लाभला.

या मंदिराबद्दल इतिहासात जास्त नोंद मिळत असल्याने बऱ्याच अंधश्रद्धा ऐकायला मिळतात ऐकीव माहितीनुसार हे मंदिर एका रात्रीत राक्षस लोकांनी बांधलं असं सांगितलं जात असलं तरी यात तथ्य नाही याबाबत मिळेल तेव्हा इतिहास मी आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

याबद्दल आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंद किंवा माहिती मिळाल्यास नक्कीच कमेंट करा आणि शेअर करा.

अकराव्या शतकातील एक प्राचीन मंदिर पूर्ण दगडी बांधकाम केलेले असून इंटर lock पद्धतीने याचे बांधकाम केले असुन  दगडी खांबावर छत उभारले असून मंदिरा कळस अलीकडच्या काळात बांधला आहे.

 हे पुर्वीचे शिव मंदीर असुन आज आपण भैरवनाथ मंदिर म्हणून ओळखतो.मंदिरात  तिन गर्भग्रह असून एका गर्भग्रह मध्यें श्री भैरवनाथ यांचीं मूर्ती असून इतर दोन   गर्भग्रह मध्यें  शिवलिंग पाहायला मिळते तसेच मंदिराच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक भग्न अवस्थेत असलेली  शिवलिंग पाहायला मिळते.

मंदिर हे पूर्वाभिमुख असून प्रवेशद्वारावर शरभ

  पाहायला मिळतो मंदिराची रचना गर्भगृह सभामंडप अशी आहे.तसेच दोन्ही बाजूला भिंतीवर  यक्ष  कोरलेले आहेत.  या पश्‍चिम बाजूला ही एक प्रवेशद्वार पाहायला मिळतं मंदिराच्या सभागृहात एक साधारणतः पाच फूट उंच असा एक शिलालेख भिंतीत बसवले असून त्यावर शंभर ओळीचा लेख कोरला आहे तो हालेकन्नड भाषेत पाहायला मिळतो हा शिलालेख राजा बिज्ज्ल् ने देवालय साठीचा दिलेले दान त्याचा उल्लेख मिळतो.

शिवाय मंदिर परिसरात पुष्करणी म्हणजेच पायऱ्या ची विहिर पाहायला मिळते पण आज ती  पुर्ण दुर्लक्षीत आहे. 

मंदिरासमोर तसेच मंदिराच्या उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात वीरगळी असून या परिसरात झालेल्या ही त्याची साक्ष देतात.

शिवाय त्यामध्ये वाघाची शिकार करताना वीरमरण आलेल्या आहेत याची वीरगळ येथे दिसून ओळखतो.

याशिवाय मंदिरातही एक स्मृतीशिला येते यामध्ये वीराच्या हातात तलवार आणि ढ़ाल असल्याचं दिसून येतं

 संरक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या वीरांची ही स्मृती शिळा आपल्याला पाहायला मिळते..

 कलचुरी घरान्यतिल आमुगी/आमेश्वरा...यानेही या प्रदेशावर शासन केलं.

बिज्ज्ल पहिला हा इ.स 1057 मध्ये चालुक्य सोमेश्वर याचा पहिला सामंत होता तो या भागात कार्यरत होतात त्याच्या आधिपत्याखाली हा भाग होता बिज्ज्लचा मुलगा कन्नम्मा दुसरा हादेखील इ.स्.1067 मध्ये चालुक्यांचा सामंत होता. डॉक्टर देसाई यांना असं सुचवलं आहे की  जोगमा इ.स. 1080 मध्ये सत्तेवर आला त्याच्याशी संबंधित असणारा सर्वात पहिली नोंद ही जत तालुक्यातील कोळीगिरी च्या शिलालेखात मिळते ते वर्ष म्हणजे 1087-88 त्यांच्या अधिपत्याखाली विक्रमादित्य  VI राज्य करत होता त्यावेळी जोगम्मा हा कराड प्रन्तातील 4000 गावाचा गव्हर्नर होता.अशीही नोंद आढळते.


माडग्याळ शिलालेखामध्ये शेजारील गावांची नाव वर्णिले आहेत त्यामध्ये सणबंडे, कोळनुर, वसुबीगे, डोंगरगाव, लोणार,मलिगे,चामुंडी टेकडी अशी नावे असुन त्यात सनबन्दे चा अर्थ सनमडी, कोलनुर चा  कोळगिरी,तर वासुबीगें चा अर्थ वळसंग असा लावायला हरकत नाही. साम्य पडताळून पाहतां निष्कर्ष लावायला हरकत नाही.

याशिवाय मंदिरासमोर अनेक तुटलेल्या मुर्त्या पूर्वी पाहायला मिळत होत्या पण आज काही नाहीसे झालेत हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे गरजेचे आहे मंदिराचे इन्फ्रास्ट्रक्‍चर पाहता येथे  भव्य मंदिर बांधण्याची योजना असावी पण सततच्या युद्धांमुळे आणि बदलत्या राजसत्तेमुळे त्यामुळे कदाचित ते अपूर्ण राहिले असावेत मंदिरासमोर असलेला एक मोठा अखंड दगडी खांब पाहता मोठ्या मंदिराच्या निर्मितीचे काम हाती घेतल्याचे दिसून येतं.

मंदिर परिसरात आणि गावाच्या जवळच आपल्या दोन पावत का दिसतात त्या पूर्वीच्या टॅक्स कलेक्शन सेंटर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


शिवाय मंदिर परिसरात समाधी स्थळे असून ती अज्ञात आहे त्याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.

इथला  घाटमाता खळखळणारे पाणी, वाहता धबधबा, निसर्गरम्य परिसर हा तालुक्यातील एकमेव ठिकाण आहे.

 निसर्ग, अतिप्राचीन मंदिर ,धबधबा, तलाव पाहायचं असेल तर आपण नक्कीच पावसाळ्यात भेट देऊ शकता.दोन्ही बाजूंनी डोंगर कडा असल्यामुळे मंदिराच्या वैभवात आणखी भर पडते तरुणांनाही हा परिसर पाडतो. सेल्फी पॉइंटसाठी हा परिसर तरुणांना आकर्षित करत आहे

या परिसरात मोठं उद्यान निर्मिती, मंगल कार्यालय बनण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून ते पूर्णत्वास येत आहे.

वीज निर्मिती प्रकल्पामुळे आणि इथे उभारलेला पवनचक्क्यांमुळे हा परिसर अजून सुंदर दिसतो. या भागात वनीकरण होणे गरजेच आहे.

प्रतिवर्षी श्रावण महिन्यात येथे उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या दरम्यान होणाऱया कुस्तीत भाग घेण्यासाठी जिल्यातील कुस्तीपटू आपलें कौशल्यं दाखविण्यासाठी येथे येतात.. कुस्ती ची परंपरा जपनारे तालुक्यातील एकमेव गाव आहे.

आपल्याला लेख कसा वाटला नक्की कळवा .


लेखन: दिनकर लवटे

मोबाईल: 9561051308


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे.


अधिक माहित साठी login करा

YouTube :

 

https://youtu.be/El1cEyJMs9E

बुधवार, २६ मे, २०२१

तेलघाणा

 #तेलघाणा

#Oil_Extractors_Stone



बापरे....एवढ मोठं उखळ...

जरी हे उखळ वाटत असलं तरी ते हे उखळ नाही...

हा एक तेलघाणा आहे,असे लाकडाचा  घाणा देखील पाहायला मिळतो..

अगदी जुना साधारणत: 500-600 वर्षा पूर्वीचे असा हा तेल घाणा अधुनिक यंत्रा मूळे निरुपयोगी झालाय...असे कितीतरी जुन्या वस्तू आज रस्त्याच्या कडेला, जुन्या मंदिरं परिसरांत, आपल्याला  पाहायला मिळतात..यासारख्या अनेक वस्तु जुने जातं, उखळ, रांजण हे बेवारस स्थितीत पाहायला मिळतात..या वस्तुनी अनेक वर्षे पूर्वजांनी उपयोगात् आणल्या ...त्यांनी त्यांचं वैभव वाढावल, जोपसल..पण अधुनिक यंत्रानी यांची जागा घेतली आणि यांना उपयोगातुन् हद्द्पार् झाल्या..

असो पण एवढं मोठं उखळ कसं बनवलं असेल, कोणी बनवलं असेल,  कश्या साठी बनवलं असेल बर ...

उत्तर सोपं असलं तरी बनवणारी व्यक्ती किती कुशल असेल.. अशी वस्तू चा वापर बैलाच्या मदतीने शेंगदाणा, तील, सूर्यफुल, नारळ, करडइ इ. पदार्थ पासून तेल काढण्या साठी करत..म्हणुन आपण याला तेलघाणा ही म्हणतो ..अश्या अडगळीत, बेवारस पडलेल्या वास्तू स्वच्छ करुन जतन करूया..नाहीतर तर या ऐतिहासीक लहान वाटणाऱ्या वास्तू मातीमोल होऊन नामशेष होतील.


लेखन:दिनकर लवटे

मो.9561051308


नमस्कार मित्रहो नवनवीन माहीती /भटकंती विषयीची माहिती आता आपण माझ्या ब्लॉगवर पाहू शकता या करता visit द्या

पुढील लिंक वर..


https://youtu.be/gmDxvDyKQFM



शुक्रवार, २१ मे, २०२१

अवकाळी

 



अवकाळी म्हणजे काय? 

वळवाचा पाऊस म्हणजे काय?


अवेळी काळवेळ नसताना अचानक आलेला पाऊस.

तुमच्या-आमच्या राशी चक्रात न बसणारा पाऊस....म्हणजे अवकाळी

उन्हाळ्याच्या सुरुवातीला मार्च एप्रिल मे महिन्याच्या मध्यंतरी भारतात हमखास अवकाळी पाऊस येऊन जातो.काहीच नाही झालं तरी शिमगा आणि पाडव्याला थोड्याफार प्रमाणात अवकाळी पाऊस येऊन जातो.

पण असा पाऊस मनाला आल्हाददायक आनंद देऊन जात असला तरी हा पाऊस शेतकरी बांधवांसाठी नक्कीच नक्कीच नुकसानदायी ठरतो हे निसर्गाचं चक्र असल्याने याला थांबवता येत नाही.


मानवाने आपल्या दैनंदिन कामकाजासाठी स्वतःला आणि निसर्गाला कालचक्रात बांधून ठेवला आहे.पण निसर्गाचा तसं नाही निसर्गाला मानवाने अगदी काळ,वेळ ऋतु ,महिना,वर्ष,आठवडा,दिवस यामध्ये जखडून ठेवले आहे.पृथ्वीवर होणाऱ्या हवामानाच्या बदलानुसार मानवाने उन्हाळा,पावसाळा, हिवाळा असे हवामानाचा कालचक्र बनवलंय.समुद्रावरील वारा ज्या दिशेने वाहिल त्या दिशेला तो बरसत राहणार, जिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल किती पाऊस कोसळणार.भारतातील पावसाळ्याचा काळ म्हणजे साधारणत जून ते सप्टेंबर या काळाच्या अगोदर पाऊस पडला तर आपण त्याला अवकाळी म्हणतो म्हणजेच अवेळी पडणारा पाऊस काळ वेळ नसलेला पाऊस म्हणजे अवकाळी.हा पाऊस लहान मुले पशुपक्षी यांना सुखाचा क्षण घेऊन जातो.अवकाळी पाऊस म्हणजे मुलांसाठी आनंदाची छान पावसामध्ये गारा गोळा करण्यासाठी मुलं कशाचीही पर्वा करत नाहीत मनसोक्त आनंद घेतात. थंडगार वारा ,गारा यांचा स्पर्श सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो.यात सोसाट्याचा वारा अचानक तापमानात झालेला बदल ढगांची एकमेकांवर आदळून होणारा प्रचंड आवाज, विजांचा कडकडाट आपल्याला अनुभवायला येतो.असा अवकाळी पाऊस काही जणांना आनंद तर काही जणांच्या पदरात दुःख टाकून जातो.




अगदी यात मोठाली झाडे उन्मळून पडतात,पशुपक्षी यांचे निवारे जमीनदोस्त होतात,आंबा ,काजू, द्राक्षे, डाळिंब आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान करून जातो.


पण हा पाऊस जास्त दिवस राहिला तर मान्सून लांबणीवर जातो असा अंदाज बांधायला हरकत नाही.


लेखन: दिनकर लवटे

मो.9561051308


नमस्कार मित्रहो नवनवीन माहीती /भटकंती विषयीची माहिती आता आपण माझ्या ब्लॉगवर/Youtube पाहू शकता या करता visit द्या

पुढील लिंक वर..


https://youtube.com/channel/UCQ-1rJM463UnkUvvRzn07jg


https://dinkarlavate.blogspot.com

सोमवार, १७ मे, २०२१

होयसळ_साम्राज्य आणि राजचिन्ह

 #होयसळ_साम्राज्य

#राजचिन्ह_राजप्रतिक

#Hoyasal_Dynasty

#Logo_Symbol

#Emblem



 होयसळ साम्राज्य कर्नाटकातील एक अतिशय शूर,  प्रतिभावंत,  वैभवशाली  आणि वास्तुकलेचा उत्तम उपासक,कला जोपासणारे कर्नाटक, आंध्रप्रदेशचा काही भाग आणि  तमिळनाडूचा काही भाग यावर राज्य करणारे सामर्थ्यवान राजवंश इसवी सन 950 ते 1355 या काळात होऊन गेला. होयसळ हे  मूळचे पश्चिम घाटातील मलेनाडू चे दहाव्या शतकात होयसळ राजवंश  हळूहळू डोके वर काढू लागला,  होयसळ  विषणुवरधन हे  मुळात जैन धर्माचे अनुयायी होते पण हिंदू तत्वज्ञानी रामानुजाचार्य यांच्या प्रभावाखाली येऊन हिंदू वैष्णव संप्रदायात प्रवेश करून विष्णुवर्धन असे नाव नामकरण केलं, होयसळ वंशातील महत्वकांशी अश्या या राजाने त्याला युद्धात यांचा पराभव करून दक्षिण कर्नाटक (गंगवाडी) आणि नोळंबवाडी चा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला. विष्णुवर्धन यांच्या प्रचंड पराक्रमामुळे होयसळ सम्रज्याची भरभराट झाली यानंतर वीर बल्लाळ 2 आणि वीर बल्लाळ 3 याने साम्राज्य वाढवले. बाराव्या शतकात वेस्टर्न चालुक्य आणि कल्याणी चे कल्चुरी यांच्या अंतर्गत वादाचा फायदा घेऊन कावेरी नदीच्या भूभागावर आपलं वर्चस्व निर्माण करून स्वतंत्र राज्यकारभार करू लागले,  बाराव्या शतकात इ.स.1187 मध्ये  वीर बल्लाळ 2 यांनी स्वतंत्र राज्य स्थापन करून आपली राजधानी (कर्नाटकातील सध्या हसन जिल्हा ) प्रथम हालेबिडू  म्हणजे द्वारसमुद्र  येथे निर्माण केली, 13व्या  शतकात मुस्लिम आक्रमकांनी राजधानी बेचिराख करून भरमसाठ लूटमार केली असली अस्सल वैभव लुटू शकले नाहीत,  नंतर त्यांनी  ती बेलुर येथे हालवण्यात  आली.


कन्नड लोक कथेनुसार होयसळ यांचे प्रतीक असलेले चिन्ह म्हणजे वाघाची शिकार करणारा युवक साला नावाच्या युवकाने वाघाची शिकार केली व आपल्या जैन धर्मगुरुला ही गोष्ट सांगितली यावरून वाघाची शिकार करणारा युवक असं प्रतीक बनलं तर सांगितलं जातं जुन्या कन्नड भाषेनुसार होइ म्हणजे वध करणे, शीकार करणे, मारणे आणि मारणार युवक म्हणजे साला यावरून या साम्रज्याचे  नाव पडलं होयसाला.

अशा आशयाचा शिलालेख मध्ये विष्णुवर्धन यांनी इ.स.1157 मध्ये कोरला आहे.पण असं असलं तरी विष्णुवर्धन याने वाघाचा प्रतीक असलेल्या चोला राजवन्श यांचा पराभव करून होयसळ साम्राज्य उभं केलं यामुळे या लोककथेला आधार मानला जात नाही यामुळेच होय संघर्षाचं प्रतीक हे वाघाला मारणारा युवक असावा असं मानलं जात.



दक्षिण भारतात कला व वास्तुकला धर्म वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले, होयसळ वास्तुकलेचा उत्तम नमुना आपण बेलुर, हळेबीड, हसन, सोमनाथपूर या भागात पाहायला मिळतो त्या भागात सुंदर डोळे दिपवणारी शेकडो मंदिर आपल्याला पहायला मिळतील. असं असलं तरीही त्यांनी हिंदू धर्मावर जैन आणि बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.


अश्या या वैभवशाली साम्रज्याचा अंत इ.स.1355 मध्ये झाला असला तरीही त्याचे वैभाव आजही अनुभवायला मिळते.


लेखन: दिनकर लवटे

मो: 9561051308


https://dinkarlavate.blogspot.com


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (दिनकर लवटे )©कॉपीराईट आहे

=====०रायकोटी किल्ला ०====

=====०रायकोटी किल्ला ०====== #Rayakottai_Fort #Rayakottai_Hill_Station https://youtu.be/aHvTqCxKOUU तामिळनाडूच्या कृष्णगिरि जिल्ह्यातील एक ह...